राजस कंपोष्ट खत व राजस कंपोष्ट खताचे फायदे
राजस कंपोष्ट खताचे फायदे..✍🏼
प्रत्येकजण कोणतीही वस्तू किंवा सेवा विकत घेतांना स्वत:चा फायदा काय होईल ? किती होईल ? याचा विचार करतोच.त्या वस्तूसाठी किंवा सेवेसाठी आपण पैसा देणार असतो, मग फायदा बघणारच, बरोबर ना!
शेती क्षेत्रासाठी क्रांती घडवून आनणारेेे ,शेतीचे ऊत्पादन वाढवणारे,कमी खर्चात शाश्वत ऊत्पादन देणारे आणि तेही अत्यल्प किंमतीत असे कितीतरी फायदे 'राजस'कंपोष्ट खतामुळे मिळणार आहे.
जमिन, हवामान, पाणी आणि पिक व्यवस्थापन या घटकांवरून शेतीचे ऊत्पादन ठरते.तसेच कृत्रीमरित्या जे रासायनिक खते,औषधे यांचाही शेती ऊत्पादनामध्ये मोठा सहभाग आहे.
अनेक शेतकरी पिकांना अती पाणी देणे, अती रासायनिक खते,अती औषधांचा वापर करणे अशा गोष्टी करतात.या गोष्टींमुळे खर्चही वाढतो आणि जमिनीही खराब होतात.खते आणि औषधे यांच्या अती वापरामुळे जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंची संख्या कमी झाली आहे म्हणून पिक ऊत्पादन कमी निघत असते.सेंद्रिय घटक सूक्ष्म जीवाणूंचे खाद्य असते आणि या खाद्यापासून पिक पोषनासाठी लागणार्या वेगवेगळ्या आम्लाची(अॅसीड)निर्मिती होते म्हणून जमिनीत सेंद्रिय खते,कंपोष्ट खते सतत वापरणे आवश्यक असते.
जमिनीचे प्राकृतीक(नैसर्गिक)गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला सेंद्रिय खतांचा वापर करावा लागेल. या सेंद्रिय खतामधे सर्वात उच्च दर्जाचे खत म्हणजे 'राजस'कंपोष्ट खत होय. कारण या खताची वैशीष्टे आणि लाभ अनेक आहेत.
वैशिष्ट्य-
- पिकांना सेंद्रिय घटक मिळतो
- सेंद्रिय घटकांमुळे सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढते
- कंपोष्ट बनवतांना वरून काही फर्टीलायजर आणि पेस्टीसाइड जीवाणू वापरले जातात त्यामुळे जमिनीत ऊपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते, शेतामध्ये वरून पुन्हा जीवाणू द्यायची गरज नाही परिणामी खर्चात बचत होते.
- या कंपोष्ट मध्ये सर्वात जास्त सेंद्रिय कर्ब आहे
- या कंपोष्ट खताची प्रोसेस जास्त काळ असल्यामुळे यात नैसर्गिकरीत्या सर्व आम्लाची(अॅसीड)निर्मिती होते त्यामुळे पिकाची पांढरी मुळी चांगली वाढते आणि वरून कोणतेही महागडे अॅसीड(टाॅनीक)द्यायची गरज नाही परिणामी खर्चात बचत होते.
- 'राजस'कंपोष्ट खत पिकाला वापरल्यास रासायनिक खत50/टक्के कमी वापरावे लागते म्हनजेच पैशाची बचत होते.
- वरून दिलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते.
- जमिनीचा सामू (PH)नियंत्रीत ठेवता येतो
- जमिनीचा कठिणपणा कमी होऊन माती सुपीक(मऊ) बनते
- असे दर्जेदार कंपोष्ट खत अत्यल्प किंमतीत अन्य कोठेही शोधूनही सापडणार नाही.
- सर्वात महत्वाचे म्हणजे पिक ऊत्पादन मध्ये वाढ होते.
- असे कितीतरी फायदे 'राजस'कंपोष्ट खतामुळे शेतकरी मित्रांना मिळणार आहे. म्हणून लवकरच संपर्क करा आणि आपल्या खर्चामध्ये बचत करुन पिक ऊत्पादन वाढवा
अधिक माहितीसाठी संपर्क करा-
अहमदनगर
संपर्क- 9890920536
0 Response to "राजस कंपोष्ट खत व राजस कंपोष्ट खताचे फायदे"
टिप्पणी पोस्ट करा